पोस्ट्स

जून, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
                        एक अनुभव असाही           " बीप बीप " असा कुठूनतरी आवाज ऐकु आला, आणि मन पटकन भुतकाळातील एका कटु अनुभवाकडे वळले. २०२१ मधील सप्टेंबरची ३० तारीख. मला आठवतो तो दिवस, गोपाळकाला होता त्या दिवशी. सुटटी असल्याने मी घरीच होतो. मी पंचायत समिती कुडाळमध्ये कर्मचारी असल्याने कुडाळातच भाडयाने राहत होतो. काहीतरी काम आलं म्हणून मी लगबगीने खाली गेलो, काम आटोपलं आणि वेगाने जिना चढत रुमकडे आलो. अचानक काय झालं काही कळलं नाही. छातीत प्रचंड वेदना जाणवल्या, पाठीत पण खुप दुखु लागले. कसाबसा मी खाली झोपलो , पण कळा थांबत नव्हत्या. माझी दोन्ही लहान मुलं, त्यांना काही कळालं नाही. त्यांनी माझ्या बायकोला बोलावलं, तेव्हा लगेच मला हॉस्पीटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं.         निदान झालं, मला सौम्य ह्रदयविकाराचा झटका आला होता. माझं वय ३२. सगळेच अवाक झाले. एवढया लहान वयात हार्टअटॅक. कोणी काही, कोणी काही बोलत होतं. शेवटी डॉक्टरांच्या सल्ल्याने मला तातडीने कोल्हापूरच्या ॲपल...
इमेज
                        उत्सवांचे बदलते स्वरुप ---------------------------------------------------------------------------------          आपला भारत एक संस्कृतीप्रधान देश आहे. वेगवेगळे सण, उत्सव व परंपरा इथे जपल्या व पाळल्या जातात. सगळे धर्म, पंथ इथे गुण्यागोविंदाने नांदत आहेत. भारत देशाची उत्सवाची परंपरा फार जुनी आहे. हिंदू धर्मात प्रत्येक महिना हा वेगवेगळे सण घेऊन येत असतो. जानेवारी महिन्यात मकर संक्राती , फेब्रुवारी महिन्यात महाशिवरात्री, मार्च महिन्यात होळी, एप्रिल महिन्यात गुढीपाडवा, रामनवमी, अक्षय तृतीया, जुन महिन्यात वटपौर्णिमा, नंतर नागपंचमी असो वा चतुर्थी आणि दिवाळी. प्रत्येक महिन्यात उत्सवांची रेलचेल चालूच असते.         प्रत्येक सणाचे स्वत:चे असे काहीतरी वेगळेपण असते, जे आपल्या संस्कृतीने जपून ठेवलेले आहे. देवांच्या जत्रा असो वा देवळातले धार्मिक कार्यक्रम हा ही उत्सवांचाच एक भाग. मकर संक्रातीला तिळगुळ देऊन वर्षभरातील गोडवा जपण्याचा संदेश दिला ...